हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर काहीबाही कमेंट्स करतात.. शब्द खड्ग ला हे अजिबात मान्य नाही. आपल्याकडे पुरावा नसतांना व्हाट्सअप विद्यापीठात तयार झालेले काही लोक ऐकीव माहितीवर महापुरुषांची टीका करतात.. यामुळे जातीपातींमध्ये दुरावा निर्माण होतो व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून या अशा द्वेष पसरविणाऱ्या लोकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.. आपल्याला काय वाटते..??
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.