विविध

कविता कागदावरची आणि प्रत्यक्षातली.. ...

खूपसे कवी - लेखक कागदावर जबरदस्त लिहितात. अगदी वाचणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येतात. मात्र, प्रत्यक्षात यातील फार थोडे समाजाभिमुख असतात. कागदावर बोलबच्चन देणे आणि प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला माणूस बनून

म्हातारचळ.....

रेल्वे प्लॕटफाॕर्मवर दोन महिलांचा संवाद कानी पडला.... खरंतर हा ज्याचा त्याचा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. पण समोरच्याशी ओळख न पाळख आणि काहीही संबंध नसतांनाही काही लोक मात्र सर्रास रिमार्क मारत असतात..

विश्वास असला की नाती टिकतात.. ...

मैत्री आणि अगदी कुठल्याही नात्यात विश्वासाबरोबरच त्या नात्याला वेळ सुद्धा द्यायला हवा..

मेहनती माणूस कधीच उपाशी मरत नाही.....

नोकरी नाही म्हणून खूपशी मराठी मुले नशिबाला, परिस्थितीला आणि सरकारला दोष देत राहतात. मात्र, या पैकी फार कमी मराठी मुले व्यवसायात उतरतात. माफ करा पण आपल्या मराठी मुलांकडे अगदी सर्व आहे पण पेशन्स नाहीत

एकनाथ शिंदेंच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपले कुठे चुकले याचा उद्धवजी विचार करतील काय .??...

शब्द खड्गने सर्वसामान्य लोकांशी या संदर्भात केलेला रोखठोक संवाद आणि सर्वसामान्यांची मते..

उद्धव ठाकरे यांचे 14 ते 16 आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची सूत्रांकडून माहिती.. ...

राजकीय वर्तुळातून येत असलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, १४ ते १६ आमदार आणि ६ ते ७

स्मार्ट मीटर काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.....

दहा बारा हजार रुपये पगार असलेल्या सर्वसामान्य माणसांना जर महिन्याला तीन चार हजार रुपये बिल येत असेल व ज्यांच्याकडे एसी आहे अशा लोकांना महिन्याला दहा हजाराच्या पुढे बिल येत असले तर आता अगोदरच सर्वच

वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात.. - सआदत हसन मंटो.....

प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांनी वेश्या आणि विकलेले पत्रकार यांची तुलना करताना म्हटले होते की, वेश्यालयातील वेश्या आणि विकलेला पत्रकार एकाच वर्गाचे असतात. पण त्या दोघींमध्ये, तवायफचा दर्जा

मनातलं पान.. आठवणींचं गाव.. ...

आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपली नाळ कापून टाकली आहे.. सुख म्हणा, गरज म्हणा किंवा अपरिहार्यता म्हणा. मात्र, आणखी जास्त सुख मिळविण्याच्या नादात आपण आपल्या मातीपासून खूप दूर आणि पुढे निघून गेलो आहोत..

आठवणींची खिडकी.. ...

प्रत्येकाच्या आयुष्यात एक आठवणींची खिडकी असते.. कातरवेळी असच खिडकीशेजारी उभं राहून बाहेर नजर टाकता आपला भूतकाळ चित्रपटासारखा डोळ्यासमोरून सरकू लागतो.. आणि बाहेरचा कोलाहल, गर्दी यापेक्षा आपल्या मनातील

माझी फोटोग्राफी.. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि पोटात भुकेची आग.. ...

जगणं म्हणावं तितकं सोपं नाही.. जगण्याची लढाई रोज लढावी लागते आहे.. एकवेळ सूर्य चंद्र उगवणे थांबेल पण पोटातली भूक कशी थांबवणार..??

मनाने मोठी असलेली माणसे हल्ली दुर्मिळ होत आहेत कारण.. ...

समोरच्याचा मोठेपणा मान्य करण्याची मनाची तयारी नसलेली माणसे नेहमी कण्हत कुढत राहतात.. वय वाढले म्हणजे तुम्हाला अक्कल आली, तुम्ही हुशार झालात असे मुळीच नाही..

काळीजादु .. अंधश्रद्धा .. बुवाबाजी .....

शिकलेले तेवढे हुकलेले असं म्हणण्याची सध्या वेळ आलेली आहे. एकवेळ अडाणी परवडले पण सुशिक्षित नाही.. कारण पैसेवाले, राजकारणी, मोठाले खेळाडू आणि व्यावसायिक हीच मंडळी अशा बुवाबाजीच्या मागे लागते असे सध्या

गोदी मीडिया पैसे खाऊन पत्रकारिता आणि देशाशी बेईमानी करीत आहे असे आपल्याला वाटते का..??...

शब्द खड्गच्या मंचावर आम्ही गेला आठवडाभर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांसमोर मांडीत आहोत.. या प्रश्नावर लोकांनी खूपच रोखठोक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत त्याचा गोषवारा इथे मांडीत आहोत..

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात.. आपल्याला काय वाटते..?? ...

हल्ली सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही महापुरुषांवर काहीबाही बोलतात हे योग्य आहे काय ?? कारण त्या त्या प्रसंगी काय वातावरण होते अथवा काय गरज होती हे आपल्याला ठाऊक नसतांना आपल्यापैकी खूपसे लोक केवळ प्रसिद्धी

भारतात नेपाळ आणि श्रीलंके सारखी क्रांती घडणे काळाची गरज आहे.....

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने सर्वसामान्यांना या संदर्भात छेडले असता अनेक बेधडक विधाने कानी पडली..

कधीच कुणासाठी चोवीस तास उपलब्ध राहू नका.. नाही बोलायला शिका.. ...

आपण माणुसकी जपणारी माणसं असल्याने आपण सतत जो येईल त्याच्या मदतीला धावतो. मदत करणे कधीच वाईट नाही. मात्र, जर तुम्ही चोवीस तास जो येईल त्याच्यासाठी उपलब्ध राहिलात तर मग कुणीही उठून तुम्हाला इमोशनली

शब्द खड्ग डिजिटल वृतपत्रात मोठ्या पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी.. ...

आपण तीन उपसंपादक आणि वृत्तसंपादक इत्यादी पदांबरोबरच आपल्या शब्द खड्ग चॅनल साठी वृत्तनिवेदक होण्याची संधी देत आहोत..

अगोदर स्वतःला ओळखायला शिका.. ...

जनरली काय होतं की आपण लोकांबद्दल सर्रास रिमार्क मारून मोकळे होतो. मात्र, कोण कुठल्या परिस्थितीत कसं वागतं हे आपल्याला प्रत्येकवेळी ठाऊक असतंच असं नाही. मात्र, आपण सरसकट मत नोंदवून मोकळे होतो..

आनेवाला पल जानेवाला है.....

मित्रांनो काही मंडळी आजचं काम उद्यावर लोटतात.. एवढी काय घाई आहे असं म्हणून हातातली सोन्यासारखी वेळ उगीचच दवडतात. तर आमच्यासारखी काही मंडळी उद्याचा आणि नंतरचा विचार न करता हातातली वेळ मनमुराद जगण्याचा

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो.. ...

ज्याला रुजायचं तो दगडातही रुजतो आणि ज्याला रुजायचच नाही तो कुठेही टाका रुजतच नाही. आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात जातात..

माझी फोटोग्राफी.. रखरखते ऊन.. अंगाची होणारी काहिली आणि अविश्रांत धावणारी डोंबिवली.. ...

कशासाठी पोटासाठी..या उक्तीचा अर्थ शोधायचा असल्यास धावणाऱ्या शहरांकडे यावे आणि इथली वरून चकचकीत दिसणारी मात्र आतून पोखरलेली वस्तुस्थिती अनुभवावी..

लिहीणाऱ्या प्रत्येकाला शब्द खड्ग मन मोकळं करण्याची संधी देत आहे.. ...

आपल्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भाव भावना असतात. मात्र, आपलं मन मोकळं करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. किंवा काही लोक अशी संधी हा काय म्हणेल किंवा तो काय म्हणेल असं इतरांना घाबरून घेत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.. ...

कुणाचे कधी कुठे आणि केव्हा नाते जुळेल हे सांगता येत नाही. आता इथे आपण आज प्रेमाच्या नात्याचा नाही तर लहान मोठे वय विसरून जुळलेल्या मैत्री आणि भावनेच्या नात्यांचा विचार करूया..

नवोदितांसाठी आणि काहीतरी वेगळे करू इच्छिणाऱ्यांसाठी शब्द खड्गचे दरवाजे खुले.. ...

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र तुमच्या मधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सदैव तत्पर आहे..

बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते.. ...

बोलणे ही कला आहे. मात्र, कुठे बोलावे, काय बोलावे, कसे आणि किती बोलावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. माझं म्हणाल तर मी स्वतः आयोजित केलेल्या कार्यक्रमांत मनसोक्त बोलतो..

शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात छापून आलेल्या सर्व प्रकारच्या बातम्या आणि फोटोंसंदर्भात संपादक सहमत असतीलच असे नाही.. ...

नमस्कार वाचक मित्र मैत्रिणींनो.. मी शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्र आणि चॅनलचा संस्थापक - मुख्य संपादक प्रा. दिपक संभाजी जाधव..

चीन हा अधिकृतपणे नास्तिक देश (Communist State) आहे. तरीही तो जगात एक नंबर आहे.....

चीनमध्ये लोक देवावर विश्वास ठेवतात, पण त्यांची पद्धत वेगळी आहे. भारतात अंधश्रद्धा खूप आहे. मूलभूत गरजांवर खर्च करण्याऐवजी मंदिर आणि पूजाअर्चनेसाठी करोडो रुपये खर्च केले जातात..

देणाऱ्याचे हात हजारो.....

हल्ली फुकटात सर्वकाही मिळविण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे..

हात तुझा हातात.....

एखाद्याचा प्रामाणिक हात आणि साथ लाभायला सुद्धा मोठे भाग्य लागते. हात आणि साथ या गोष्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. या गोष्टी एकमेकांपासून कधीच वेगळ्या होऊन स्वतःचं अस्तित्व दाखवू शकत नाहीत..

सध्याचे सरकार.. लोकांच्या भावना.. गरम गरम चहा आणि गप्पांचा फड.....

चहा हातात आला की विषय आपोआप सुचतात.. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, घरगुती गप्पा आणि गॉसिप असो की अगदी इथे बसून चंद्रावर फेरफटका मारून येणे असो. चहाला कुठल्याही विषयाचे वावडे नाही..

प्रेम.....

हल्ली माणसाचा प्रामाणिक स्वभाव न बघता फक्त वरल्या अंगाला बघून तथा शो शायनिंगला भुलून खूपशा मुली आयुष्याचं मातेरं करून घेत आहेत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तयार झालेली तरुणपिढी व्हॉट्सॲप वर मारलेल्या

सरकारी अधिकारी आणि पोलिसांना माणुसकीचे धडे देण्याची गरज आहे.. आपल्याला काय वाटते..??...

सर्वसामान्य माणसांना कुणी वाली राहिलेला नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्वाभिमानी लोकांची नेहमीच समाजात कुचंबणा होते आणि लाळघोटी मंडळी सत्तेचा सोपान चढतात हे अगदी सर्वांनाच ठाऊक आहे..

आपल्या आयुष्यात एक तरी उनाड दिवस असावा.....

आपल्यापैकी अनेक लोक हा काय म्हणेल आणि तो काय म्हणेल याची चिंता करीत घाबरून जगत आहे. आपण स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करीत असल्याने जगणे हातातून सटकून जात आहे..

आपण एकमेकांकडे फक्त माणूस म्हणून बघायला हवे.....

जात, पात, धर्म, पंथ.. तू मोठा की, मी मोठा.. तुझी जात महान की माझी जात महान आणि पराकोटीचे देव देव करीत बसण्या पेक्षा आज आपण मानवता जपायला पाहिजे. आकाशात देव आहे की नाही मला ठाऊक नाही..

आनंदी आनंद गडे.....

आपल्या अवती भोवतीच्या बहुतांश लोकांसाठी रोजचं जगणं खूपच कष्टप्रद झालेले आहे. जगण्याची रोज नवी लढाई लढावी लागते आहे. पूर्वीच्या काळी सर्व सुशेगात होते असे मुळीच नाही..

हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही.....

मित्रांनो तोंडातून गेलेला शब्द आणि हातातून निसटून गेलेली वेळ पुन्हा कधीच माघारी येत नाही.. आणि म्हणून आपण शब्द आणि वेळ दोन्हीही पाळायलाच हवी..

काठावरून गम्मत बघणारी मंडळी.....

काठावरून गम्मत बघणाऱ्या मंडळींचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल. मला या अशा स्वरूपाच्या मंडळींचा इतरांपेक्षा जरा जास्तच अनुभव आहे. ही मंडळी सोबत असूनही सोबत नसतात..

जबाबदारीच्या ओझ्याखाली खूपदा जगणे राहून जाते.....

कुणावर कुठल्या वयात कुठली जबाबदारी येईल हे सांगता येत नाही. एक मात्र खरे की जबाबदारीने माणूस परिपक्व व परिपूर्ण होतो..

गोड बोलून टाळणारी माणसे.....

माणसाच्या स्वभावाचा थांगपत्ता आजवर कुणालाच लागलेला नाही. माणूस स्वतः कसा वागेल हे सुद्धा त्या माणसाला निश्चितपणे सांगता येत नाही.. सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या चेहऱ्याचे आणि

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि.....

मानवी प्रवृत्ती आणि स्वभाव कधीच आणि कुणालाच कळू शकलेला नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणात आत्मकेंद्री झालेले असल्याने आपण फक्त मी करेल तेच योग्य या विचारात स्वतःला गुरफटून घेतलेले आहे..

मोबाईल मुळे माणूस माणसापासून भावनिकदृष्ट्या दूर चालला आहे.....

पूर्वी पंधरा पैशाच्या पोस्टकार्ड मध्ये आणि पंचवीस पैशाच्या आंतरदेशीय पत्रात माणूस त्या पत्रांतील शब्दांमध्ये आपल्या आप्तस्वकियांचे चेहरे बघत होता. या पत्रांची आतुरतेने वाट पाहिली जायची व कधी आसू तर

चेहऱ्या मागचे चेहरे.....

आपल्या घरात.. मैत्रीत.. आजूबाजूला.. आणि आपल्या स्वतःतही अनेक चेहरे लपलेले आहेत. या चेहऱ्या मागच्या चेहऱ्यांचे गणित सहजा सहजी कुणालाच सोडवता येत नाही..

आयुष्यात कधी कुणी कुणाला सहज भेटत नाही.....

श्रीकृष्ण म्हणतात काहीतरी पूर्वजन्मीचे राहून गेलेले असते म्हणून लोक एकमेकांना भेटतात.. कारण असल्याशिवाय कधीच कुणी कुणाला असे सहज भेटत नाही..

नाते जुळले मनाशी मनाचे.....

नातं कधी कुठे आणि केव्हा कुणाशी जुळेल हे कुणीच सांगू शकत नाही.. नात्याला प्रेमासारखीच वयाची, जात पात, रंग रूप आणि प्रांत, देश विदेशाची गरज नसते. तुम्ही सिंगल असा अथवा विवाहित असा. नाते जुळायचे असेल तर

खूप समजावून सुद्धा एखाद्या व्यक्तीला पटतच नसेल तर अशा व्यक्तीला आयुष्यातून कायमचे बाय बाय करावे.....

मित्रांनो खूपदा असे होते की, आपली चूक नसतांनाही समोरची व्यक्ती आपण चुकलो आहे असे समजून आपले काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. जे आपले असतात त्यांना कारणे देण्याची अजिबात गरज लागत नाही..

डोंबिवली फास्ट..!!...

वरील चित्रात डोंबिवली येथून सुटणारी सकाळी नऊ वाजून १० मिनिटांची ही ट्रेन आहे.. बघा इतक्या गर्दीत प्रवास करावा लागत आहे..

मदत कुणाला करावी हे आपल्याला कळायलाच हवे.....

हल्लीच्या स्वार्थी जमान्यात उठसुठ कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. गरज सरली की लोक आपल्याला एका झटक्यात विसरून जातात. मग तू कोण आणि मी कोण अशी परिस्थिती समोर येते..

बोलावणं आल्याशिवाय नाही.....

पूर्वी मराठी माध्यमात दिवाकर यांनी लिहिलेला 'बोलावणं आल्याशिवाय नाही..' हा अप्रतिम धडा होता.. आज याच अनुषंगाने तुमच्याशी बोलणार आहे. मी जे बोलतोय ते तुमच्या पैकी अनेकांनी अनुभवले असेलच..

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.