कसारा - वाशाळा रस्त्याजवळी भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होण्याची शक्यता..

संबंधित प्रशासन प्रवासी तथा वाहनचालकांचे जीव गेल्या नंतर जागे होणार काय ?

सविस्तर वृत्त असे की, कसारा गावातून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवाश्यांना ये -जा करण्यासाठी तथा अनेकांना जीवघेणा अपघात झाल्यानंतर आता भुयारी मार्ग बनविण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने याठिकाणी पुन्हा अपघात होण्याचे दाट श्यक्यता निर्माण झाली आहे. मात्र एवढे होऊनही रस्त्ते प्राधिकरण याकडे लक्ष पुरवीत नसल्याने आता काय लोकांचे अपघातात जीव गेल्यानंतर तुम्ही या मार्गाकडे लक्ष देणार का ? आणि कधी? असा संताप सवाल नागरिक व  प्रवासी संबंधितांना विचारीत आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत मोखावणे - कसारा हद्दीतील कसारा  - नाशिक एन . एच . क्रमांक 3 या महामार्गाच्या  रस्तयाचे काम बारा ते चौदा वर्षांपूर्वी करण्यात आले त्यावेळी कसारा येथून वाशाळा कडे वाहनांना जाण्या - येण्यासाठी स्थानिक नागरिक भुयारी मार्गाची मागणी सातत्याने रस्ते प्राधिकरण यांच्याकडे करीत होते. मात्र, सदर मागणीकडे संबंधित प्रशासनाने लक्ष न दिल्याने रस्ता क्रॉसिंग करताना टू व्हीलर चालक व वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागल्या नंतर त्या ठिकाणी दोन - तीन वर्षा नंतर  एन .  एच .3 प्राधिकरण यांनी भुयारी मार्ग बनविला. परंतु या भुयारी मार्गाच्या काही अंतरावर कसारा येथे येणाऱ्या रस्ताला खुप माठा चढ दिल्याने अशा अपघाती रस्त्यावर चारचाकी वाहन चालक व टू व्हिलर चालवताना कसरत करावी लागत आहे . या भुयारी मार्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावासाचे पाणी साचून चढाच्या तळा जवळ मोठ मोठे खड्डे पडल्याने छोट्या  - मोठ्या वाहनांचा अपघात होऊन जिवितहानी होण्याचे स्थिती निर्माण झाली आहे . कसारा येथे भुयार वेळेत न बनवल्याने अनेकांचे जिव गेले आहेत तसेच एन . एच 3 प्राधिकरण जिव घेण्याची वाट बघत आहे का?  असा संतप्त सवाल रवासी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधितांना केला आहे..

- श्री. रमाकांत पालवे. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

14

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.