नेपाळमधील त्रिशुली नदीच्या खोऱ्यात आलेल्या महापुरानंतर ९ दिवस बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांना शुक्रवारी सुरक्षित आणि जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे..
काठमांडू : नेपाळमधील त्रिशुली नदीच्या खोऱ्यात आलेल्या महापुरानंतर ९ दिवस बोगद्यात अडकलेल्या दोन कामगारांना शुक्रवारी सुरक्षित आणि जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. त्रिशुली ३-ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात ही बचाव मोहीम फत्ते करण्यात आली. नेपाळ सैन्याच्या जनसंपर्क संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, कबीर महर्जन (वय ४५, यांत्रिक पर्यवेक्षक) आणि संजय शाह (वय ३०, फोरमन) अशी या सुखरूप सुटका झालेल्या कामगारांची नावे आहेत.
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने बाहेर काढल्यानंतर संजय शाह यांनी सांगितले की, पूर आला तेव्हा ते कंट्रोल रूममध्ये कार्यरत होते. सर्वांना सुरक्षित बाहेर काढणे ही त्यांची जबाबदारी असल्याने त्यांनी इतरांना पळून जाण्यास सांगितले. मात्र, सर्वांना बाहेर पाठवेपर्यंत खूप उशीर झाला आणि ते स्वतः अडकले.
बोगद्यात अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता शाह यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आसपासच्या ३-४ लोकांशी आवाज देऊन संपर्क साधू शकत होतो. बोगदा खूप लांब असल्याने आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने काही लोक आणखी खोलवर अडकले असण्याची भीती आहे, असे ते म्हणाले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.