नवी दिल्ली : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. १५) लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 'वंदे मातरम्'चा जयघोष घुमला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच १५ ऑगस्टच्या सोहळ्यात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 'वंदे मातरम्'चे सादरीकरण करण्यात आले..
'आज प्रत्येक हृदय वंदे मातरम्च्या तालावर'
लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज प्रत्येक हृदय वंदे मातरम्च्या तालावर धडधडत आहे. आज हर घर तिरंगा आहे, हर मन तिरंगा आहे." असे त्यांनी सांगितले.
पहिल्यांदाच 'वंदे मातरम्'चा स्वर घुमला
"हा ऐतिहासिक दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 'वंदे मातरम्'चा स्वर घुमला आहे. आजच्या सोहळ्यात उपस्थित प्रत्येकासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
'तिरंगा प्रत्येक घरात, प्रत्येक मनात'
'वंदे मातरम्'चा स्वर देशातील प्रत्येकाच्या मनात घुमत असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्याचवेळी देशभरातील घरांवर तिरंगा फडकत असून, प्रत्येक भारतीयाच्या मनातही तिरंग्याची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. देश नव्या संकल्पांसह उत्साह आणि जोमाने पुढे जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
NCC कॅडेट्स आणि 'माय भारत' स्वयंसेवकांचे सादरीकरण
पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) कॅडेट्स आणि 'माय भारत'चे स्वयंसेवक 'वंदे मातरम्'चे सामूहिक सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रगीताचे सादरीकरण होईल.
२,५०० कॅडेट्स आणि स्वयंसेवकांचा सहभाग
या विशेष सोहळ्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलातील २,५०० कॅडेट्स तसेच 'माय भारत'चे स्वयंसेवक सहभागी झाले असून लाल किल्ल्याच्या तटबंदीसमोरील ज्ञानपथावर त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती.
'वंदे मातरम्'च्या माध्यमातून विशेष रचना
NCC कॅडेट्स आणि 'माय भारत'चे स्वयंसेवक ज्ञानपथावर एकत्र येऊन 'वंदे मातरम्'ची विशेष रचना साकारत आहेत. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला देशभक्तीच्या भावनेसोबतच ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.