पाकिस्तानवर विश्वास ठेवणे म्हणजे सापावर विश्वास ठेवण्यासारखे आहे..

आतापर्यंत भारत पाकिस्तान मध्ये १९४८, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्धं झाली आहेत. भारताने या चारही युद्धांत पाकिस्तानची चांगलीच जिरवली आहे..

आणि स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा एक तुकडा तोडून बांगलादेश निर्माण केला हा इतिहास आहे. मात्र, एवढे होऊनही पाकिस्तान सुधारण्याची चिन्हे नाहीत. भारता बरोबर सरळ युद्धात आपण जिंकणार  नाही याची पाकिस्तानला पूर्णपणे जाणीव असल्याने पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवाद पोसला आहे. आणि या अतिरेकी दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताशी छुपी युद्धे सुरु ठेवली आहेत. खरे तर पाकिस्तानात खायला अन्न नाही इतकी भुके कंगाली आहे. मात्र, तेथील मशिदींत जिहाद आणि जन्नत याचे पाठ लहानपणा पासूनच मुलांना शिकविले जातात आणि भारत आपला दुश्मन आहे असे या लहान मुलांच्या मनात पेरले जाते. भारत पाकिस्तानकडे वेळोवेळी दुर्लक्ष करीत राहिला आणि याचाच पाकने गैरफायदा घेतला. खरे तर कट्टर जातीयवाद आणि कट्टर देशवाद कुणालाच हितावह नाही. जग बदलत आहे त्यानुसार आपणही बदलायला हवे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हायला हवे, स्वतःची सर्वांगीण प्रगती करायला हवी. पण, पाकिस्तानला हे अजिबात मान्य नाही. खायला अन्न नाही आणि पाकिस्तान काश्मीर जिंकण्याची स्वप्नं बघतोय.

तिथे हुकूमशाही आणि लष्करशाही असल्याने सतत अस्थिरता आहे. बलुचिस्थान, सिंध सारखे इतर आणखी तीन भाग स्वतंत्र राष्ट्र बनण्याच्या तयारीत आहेत. मोदी साहेबांना पाकिस्तानचे पाच तुकडे करण्याची नामी संधी चालून आली होती पण त्यांनी ही संधी अमेरिकेच्या विनंती वजा दबावाला बळी पडून गमावली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. आता इथे यावेळी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून कायमचं पुसून टाकलं असतं. पाकिस्तान मुळे  मुस्लिम समाजाला सगळीकडे दहशतवादी जात म्हणून पाहिले जाते. आणि खरं सांगायचं तर हे लोक सगळ्या जगाला डोकेदुखी ठरलेले आहेत. पाकिस्तानकडे ऑटोमिक पॉवर आहे असे ते वारंवार सांगतात आणि जर खरंच हे सत्य असेल तर ते भारतावर क्षणाचाही विचार न करता बॉम्ब टाकतील आणि भारत बसेल विचार करीत. युद्ध कधीच आणि कुणालाच परवडणारे नाही हे एकशेदहा टक्के सत्य आणि मान्य जरी असले तरी पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानवर विश्वास ठेवणे म्हणजे सापावर विश्वास ठेवण्यासारखे आहे.. कारण पाकिस्तान हा दोन तोंडाचा साप आहे आणि म्हणूनच त्याची दोन्हीही तोंडे ठेचून काढायला हवी आहेत..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

25

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.