अपघाताची भरपाई २४०० कोटींवर? देशाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठा दावा ठरणार..

‘एअर इंडिया’च्या बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा देशाच्या आजवरच्या हवाई इतिहासातील सर्वांत मोठा विमा भरपाई द्यावा लागणारा अपघात ठरण्याची शक्यता आहे..

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: ‘एअर इंडिया’ची मालकी ‘टाटा समूहा’कडे गेल्यानंतर विमा खरेदीसाठी सरकारी निविदा प्रक्रिया बंद करण्यात आली. आता विमा कंपनी आणि रीइन्शुरन्स पुरवठादारांची नेमणूक स्वतः ‘टाटा समूह’ करते. जोखीम आणि खर्च यांचे मूल्यमापन करून निर्णय घेतला जातो. पूर्वी ही जबाबदारी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांवर होती. दर वर्षी निविदा काढून विमा निश्चित केला जात असे. परंतु, आता ‘टाटा समूहा’कडे त्याचा संपूर्ण अधिकार आहे.

‘एअर इंडिया’च्या बोइंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच्या भीषण अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा देशाच्या आजवरच्या हवाई इतिहासातील सर्वांत मोठा विमा भरपाई द्यावा लागणारा अपघात ठरण्याची शक्यता आहे.

विमा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एअर इंडियाच्या एकूण नुकसानाची किंमत सुमारे २१.१ कोटी डॉलर ते २८ कोटी डॉलर (अंदाजे २४०० कोटी रुपये) दरम्यान असू शकते, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. अपघातात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन प्रवासी होता. परदेशी प्रवाशांची ही संख्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कायद्यांतर्गत (माँट्रियल कन्व्हेन्शन १९९९नुसार) नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

अंदाजे नुकसान किती?

‘एअर इंडिया’च्या विमानाचा कालावधी, स्थिती आदी घटक लक्षात घेता हे नुकसान आठ कोटी डॉलर ते २५ कोटी डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे. विमान ज्या इमारतीवर कोसळले, तिचे नुकसान आणि त्यातील मृत्यूंसाठीही ‘एअर इंडिया’वर दायित्व येऊ शकते.

सध्या ‘एअर इंडिया’ने मृतांच्या कुटुंबीयांना तात्पुरती एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. करारानुसार, प्रत्येक मृत प्रवाशासाठी जास्तीत जास्त एक लाख ७१ हजार डॉलर म्हणजेच १.४७ कोटी रुपयांची भरपाई मिळू शकते.

10

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.