चार वर्षांत भारतातील चार मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर सर्वात कमी आहे. २०२४-२५ मध्ये ४२,६७,७७१ कोटी रुपयांच्या जीएसडीपीसह ते देशातील सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था राहिले आहे..
कोविडनंतरच्या काळात, राज्याचा जीएसडीपी (ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट) २०२१-२२ ते २०२४-२५ दरम्यान ४३ टक्क्यांनी वाढला. तो विकासदरात कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडूपेक्षा मागे आहे, असे अधिकृत आकडेवारी सांगते. तथापि, संपूर्ण अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र चार राज्यांमध्ये मोठ्या फरकाने आघाडीवर आहे.
चार राज्यांमध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या कर्नाटकने त्याच कालावधीत जीएसडीपीमध्ये जवळजवळ ६५ टक्क्यांनी वाढ नोंदवली. महाराष्ट्राचा विकास दर कर्नाटकपेक्षा २० टक्क्यांहून अधिक मागे आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात हे भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन मानले जातात. तीन राज्यांमध्ये (कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू) मोठी गुंतवणूक आहे. तर त्यांच्या स्थानिक व्यवसायांनी जसे की स्टार्टअप्सनेदेखील त्यांच्या जीएसडीपीमध्ये योगदान दिले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.