राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कुठल्या भागात शेतीचे, तर काही जिल्ह्यांत घरांचे प्रचंड नुकसान झाले. याचे तत्काळ पंचनामे करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसाचा आढावा घेण्यात आला..
मुंबई : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कुठल्या भागात शेतीचे, तर काही जिल्ह्यांत घरांचे प्रचंड नुकसान झाले. याचे तत्काळ पंचनामे करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी, धरणातील पाणीसाठ्यासाठी, पीक परिस्थिती, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित विविध यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून तसेच पाण्यात बुडून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत व नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
राज्य आपत्कालीन कार्यकेंद्रातून बचाव व मदत कार्यासाठी प्रभावी समन्वय साधण्यात येत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. ‘सचेत’ प्रणालीवरून १९ कोटी पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश मोबाइल तसेच लघु संदेशाद्वरे देण्यात येत आहेत. तसेच १९ कोटी २२ लाख मोबाइल, लघु संदेश पाठविण्यात आले. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएसने सुसज्ज करण्यात आले आहे.
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.