UPI वरील शुल्काचा भार व्यापाऱ्यांवर नको; दिल्लीतील व्यापाऱ्यांना धास्ती, पुन्हा रोखीकडे वळण्याचा निर्णय..
यूपीआयवरील शुल्कामुळे आधीच कमी नफ्यावर काम करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी यूपीआय पेमेंट हा एक महागडा पर्याय ठरेल. व्यापारी आणि ग्राहक दोघांसाठी डिजिटल पेमेंट सोपे व्हावे यासाठी यूपीआय सुरू करण्यात आले होते. आता व्यापाऱ्यांना ₹२,००० वरील व्यवहारांवर अतिरिक्त भार सहन करावा लागला तर अनेकजण रोख व्यवहारांना प्राधान्य देतील. हे सरकार उद्या आमच्या बँक अकाउंट मधील पैसे सुद्धा काढून घेईल अशी संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य लोकांना लुटण्यापलीकडे या सरकारने काहीच चांगले काम केले नसल्याच्या भावना लोक मांडीत आहेत..
हे सरकार लुटारूंचे आहे व मोदी आणि अमित शहा हे खुलेआम लोकांना फसवित असल्याच्या भावना सुद्धा काही व्यापाऱ्यांनी शब्द खड्ग सोबत बोलतांना व्यक्त केल्या. तर काही जणांच्या मते मोदी सरकार अमेरिकेच्या हातातील बाहुले असल्याने अमेरिका जसे नाचविते तसे मोदी नाचतात..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.