यंदाच्या उन्हाळ्यात ४०० कोटी नागरिकांची होरपळ; वातावरण बदलाचा मोठा फटका; शास्त्रज्ञांची माहिती..

वातावरण बदलाचे परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहेत. त्यामुळेच उष्णतेच्या लाटांचा मोठा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्या म्हणजेच ४०० कोटी लोकसंख्येला यंदा उष्णतेने होरपळून काढले. वातावरण बदलामुळे मे २०२४ ते मे २०२५ या वर्षभरात नागरिकांना एक महिना अधिक उष्ण तापमानाचा ताप सहन करावा लागला..

या उष्णतेच्या लाटेमुळे लोक आजारी पडले, मृत्यू झाले, पिकांचे नुकसान झाले, ऊर्जा व आरोग्य देखभाल प्रणालींवर दबाव आला.

वर्ल्ड वेदर एट्रिब्युशन, क्लायमेट सेंट्रल आणि रेड क्रॉसच्या अहवालात दावा केला आहे की, उष्णता वाढण्यास मोठे कारण हे वातावरण बदल आहे. पूर व चक्रीवादळ हे कायम चर्चेत असतात. पण, तीव्र उष्णता ही गंभीर बाब आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद केली जात नाही. या मृत्यूंची नोंद ह्रदयरोग, किडनी निकामी होणे आदी आजारांच्या नावावर नोंदवली जाते.

घरात किंवा रुग्णालयात मृत्यू

हा अहवाल तयार करणारे इम्पिरियल कॉलेज लंडनमधील वातावरण बदलाचे असोसिएट प्राध्यापक फ्रेडरिक ओटो म्हणाले की, उष्णतेमुळे होणारे मृत्यू हे शांतपणे होणाऱ्या हत्या आहेत. उष्णतेच्या लाटेत लोक रस्त्यावर मरत नाहीत. त्यांचे मृत्यू रुग्णालयात किंवा घरात होतात. ते सर्वसाधारणत: इतरांना कळत नाहीत.

इशारा यंत्रणा वाढवणे गरजेचे

‘रेड क्रॉस रेड क्रिसेंट क्लायमेट सेंटर’चे शहर विभागाचे प्रमुख रूप सिंह म्हणाले की, तापमान वाढत असल्याची जाणीव नागरिकांमध्ये आहे. पण, हे वातावरण बदलामुळे होते हे त्यांना कळत नाही. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची माहिती देणाऱ्या इशारा यंत्रणा वाढवण्याची गरज आहे. तसेच जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करणे गरजेचे आहे.

5
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.