अवकाळी पावसाने शहापुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा .. आमदार - दौलत दरोडा यांची मागणी..

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने शहापूर तालुक्यातील उन्हाळी भातशेती , भाजीपाला , फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व हातातोंडाशी आलेला घास निघून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये व अवकाळी पाऊसात नुकसान झालेल्या पिकांचे तथा भाजीपाला आणि फळ लागवडीचे पंचनामे करुन हाणीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदत करावी यासाठी शहापूर विधानसभाचे आमदार दौलत दरोडा यांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि  शहापुर तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. याच पावसाने विटभट्यांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे याकडे सुद्धा संबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी आमदार दरोडा यांनी केली आहे.

- श्री. रमाकांत पालवे. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

17
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.