एसटी कर्मचाऱ्यांचा सन्मान हाच आपल्यासाठी गौरव असावा..

प्रवाशांच्या प्रवासाची आणि जीविताची काळजी घेऊन त्यांना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहचवण्यासाठी तत्पर एसटी आणि एसटीचे सर्व कर्मचारी सदैव तत्पर असतात .सर्वांची लाडकी लालपरी असे एसटीला मोठ्या अभिमानाने म्हटले जाते ते काही वावगे नाही. ज्या वेळेस नागरीकांना प्रवास करण्यासाठी सुविधा नव्हती त्यावेळी शहरापासून ते शेवटच्या गाव खेड्या पर्यंत जाणारी एसटी लालपरी होती . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची 1 जुन 1948 रोजी पुणे ते नगर पहिली एसटी धावली आहे . त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरीकांच्या गळ्यातील एसटी ताईत झाली. पुर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा खुप मान सन्मान केला जात होता . एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा कडून मिळणारा तुटपुंज्या पगार असताना देखील ते प्रामाणिकपणे ड्युटी करून प्रवाशांची आत्मीयतेने काळजी घेत आहेत.

आज लोकांकडे पैसा आला गाड्या घोड्या आल्यामुळे जुने दिवस विसरून काही लोकांतील  माणूसपण संपत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. तसेच वाहनांची संख्या झपाट्याने वाढत चालल्यामुळे एसटी रस्त्यावर चालवताना  चालकाला व वाहकाला वाहने  पाहताना कसरत करावी लागत आहे . हल्ली छोटे - मोठे वाहन चालक एसटीला मार्ग काढून देण्या ऐवजी त्यांना काही माजोरी लोक अरेरावीची भाषा तथा शिविगाळ करून एसटी चालक वाचकाचे मानसिक  खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात . मात्र, त्याकडे चालक व वाहक लक्ष न देता प्रवाशांना सुखरूप नियोजित ठिकाणी सोडून आपले कर्तव्य पार पाडत आहेत . हल्ली माजोरी लोकांकडून एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण  देखील होत आहे व त्यांच्यावर हल्ला करणारे व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून पाहिला मिळत आहेत या घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिला अशोभनिय आहे. अशा हल्लेखोरांवर कायद्याने कडक कारवाई केली जावी. एसटी अत्यावश्यक सेवा आहे . गोरगरीबाची माय माऊली आहे . ती जर नसली तर गोरगरिबांचे काय हालत होतील याची जाणीव नियमित एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आहे.

सध्या खूपशा एसटी बसेसची अवस्था खुप बिकट आहे. जुन्या बस भंगारात विकून नवीन बस घ्यायला हव्यात. त्यामुळे प्रवाशांचा आनंदन द्विगुणित होईल. पण, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग याकडे लक्ष देत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे . तसेच कितीही प्रामाणिकपणे काम करा मात्र अपवाद वगळता सर्वसामान्य नागरिक आणि एसटी प्रवाशांकडून एसटीवाल्यांचे कौतुक होत नसल्याची खंत अनेक कर्मचारी बोलून दाखवितात. आता आपण सर्वांनी एकदिलाने एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुक आणि त्यांचा योग्य तो गौरव आणि सन्मान करण्याची गरज आहे.  महाराष्ट्र शासनानेही त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ठोस कार्यक्रम घ्यावा असे  एसटीवर प्रेम करणाऱ्या नागरीकांचे म्हणणे आहे. कारण एसटी जगली तर सर्वसामान्य प्रवाशी जगतील. खेड्यापाड्यात दारोदार आणि विनंती थांब्याला  प्रतिसाद देणारी ही एसटी सर्वसामान्यांच्या जगण्यातील एक महत्वाचा दुवा आहे आणि हाच दुवा आता राज्यसरकारचे एसटी महामंडळ आणि आपल्या सारख्या एसटी प्रेमी सर्वसामान्य प्रवाशांना जपून ठेवण्याची आणि एसटीने नियमित प्रवास करण्याची नितांत गरज आहे..

- श्री. रमाकांत पालवे. महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

7
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.